शहरं
Join us  
Trending Stories
1
Ganesh Kale Shot Dead: गणेशची हत्या करून फरार झालेले चार आरोपी सापडले; दोघांना अटक, नावे आली समोर
2
IND vs SA Women's World Cup 2025 Final Live Streaming: फायनलमध्ये 'ही' गोष्ट ठरेल भारतासाठी जमेची बाजू
3
"वर्गात एक विद्यार्थी असेल तरी मराठीची तुकडी चालली पाहिजे", विश्वास पाटील यांची स्पष्ट भूमिका
4
Ganesh Kale: मानेत, छातीत व पोटात घुसल्या गोळ्या, पळण्याआधीच चौघांनी गणेशला संपवले; आरोपींची नावे काय?
5
IND vs AUS 3rd T20I Live Streaming : हा सामना जिंका नाहीतर मालिका विसरा! टीम इंडियाकडे शेवटची संधी
6
Satara: फलटणमध्ये आणखी एका तरुणीने संपवले आयुष्य, आंचलच्या मृत्युसाठी आईवडिलच ठरले कारण
7
निर्भिड आणि बेधडक पत्रकारितेची आज गरज; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे मत
8
Pune Crime: नाशिकच्या तरुणीवर हिंजवडीत कोयत्याने हल्ला! प्रेमप्रकरणातून तरुणाने केला जीव घेण्याचा प्रयत्न
9
Phaltan Doctor Death: डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणाचा IPS तेजस्विनी सातपुते करणार तपास, एसआयटी स्थापन
10
Ganesh Kale Pune: आधी चार गोळ्या झाडल्या, नंतर डोक्यात कोयत्याने वार; काळेच्या हत्येचा पोलिसांनी सांगितला थरार
11
अमेरिका 'या' देशावर स्ट्राईक करण्याच्या तयारीत, ट्रम्प यांनी दिला आदेश?; रिपोर्टमधून खुलासा
12
चीनसोबत मिळून रशियानं दिला भारताला दगा?; ताजिकिस्तानात रचलं षडयंत्र, वाचा इनसाईड स्टोरी
13
परदेशातील भारताचा एकमेव सैन्य तळ हटवावा लागला, २ वर्षांनी मोठा खुलासा; किती मोठा झटका?
14
Pune Crime: पुण्यात पुन्हा गँगवार! कोंढव्यात गणेश काळेची गोळ्या घालून हत्या, कोयत्यानेही केले वार
15
आजचा मोर्चा संयुक्त महाराष्ट्र चळवळीची आठवण करून देणारा; शरद पवारांनी जागवल्या आठवणी
16
IND vs SA: वनडेत द. आफ्रिकेच्या पोरींचा भारतासमोर नाही चालत जोर; पण वर्ल्डकपमध्ये समोर येतात तेव्हा...
17
"बदतमीजों का...!"; राहुल गांधींसंदर्भात आचार्य प्रमोद कृष्णम यांचं वादग्रस्त विधान, RSS संदर्भातही बोलले
18
"मल्लिकार्जून खरगेंनी इतिहासातून धडा घ्यावा", आरएसएसचे दत्तात्रय होसबळे काँग्रेसच्या अध्यक्षांवर भडकले
19
चीनचा एक निर्णय अन् जागतिक बाजारात सोन्याच्या दराचं गणित बदलणार; भारतावर काय परिणाम होणार?
20
निवडणूक आयोगाकडे माझ्या नावाने अर्ज गेला, मोबाईल नंबर...; उद्धव ठाकरेंचा मोठा गौप्यस्फोट

धर्माबरोबरच इतिहासाचे विभाजन धोक्याचे: तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:22 IST

सांगली : आपले गट तयार करून त्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात महापुरूषांच्या विचारांच्या विरोधकांना रान मोकळे करून दिले जात ...

सांगली : आपले गट तयार करून त्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात महापुरूषांच्या विचारांच्या विरोधकांना रान मोकळे करून दिले जात आहे. आपले लोक उपेक्षित राहिले तरच आपला विकास होईल, हा घातक विचार पेरला जात आहे. महापुरूषांच्या विचारांना पुतळ्यांमध्येच बंदिस्त करून ठेवत धर्माबरोबरच इतिहासाचेही करण्यात येत असलेले हे विभाजन धोकादायक आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी फौंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त तुषार गांधी यांनी रविवारी सांगलीत केले.प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरमच्यावतीने आयोजित मार्क्स, गांधी, आंबेडकर यांचा ‘राष्टÑवाद’ संकल्पनेवरील विचारमंथनात बीजभाषणावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनीही या विषयावर परखडपणे आपली मते व्यक्त केली.गांधी म्हणाले, महापुरूषांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या कार्यकर्त्यांना परस्परात लढवून आपला हेतू साध्य करण्यासाठी काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळेच पुतळ्यांच्या उंचीबरोबरच त्या बांधणाºयांच्याही उंचीच्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. गांधी व आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद जरूर होते. मात्र त्यांच्यात वैमनस्य नव्हते. तरीही त्यांच्यातील मतभेद, वैमनस्यच अधिक प्रकर्षाने दाखविण्यात काहीजण आघाडी घेत आहेत. एकमेकांच्या विचारांचा तिरस्कार न करता त्यांचा आदर ठेवून काम केल्यासच या विरोधकांना चपराक बसणार आहे. धर्माच्या विभाजनाबरोबरच इतिहासाच्या विभाजनाचे कटकारस्थान रचले जात असून, सर्वांनीच सजग राहिले पाहिजे. त्यांच्यातील मतभेदांपेक्षा त्यांच्या समाजविषयक कार्यावर सर्वांनी विचार करायला हवा.राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले, अलीकडे राष्टÑवादाचा बोलबाला सुरू झाला असला तरी, दुर्दैवाने कोणालाही राष्टÑवाद समजलेलाच नाही. रोजच्या जगण्याबद्दल, समस्यांबद्दल बोलले तरी त्याला राष्टÑद्रोही ठरविले जात आहे. आपल्या समुदायापुरता, समाजापुरता महापुरूषांनी कधीच विचार केला नव्हता. राष्ट्रवादाच्याविरोधात नक्षलवादाला पुढे केले जात आहे. राष्टÑवादाचे खरे भान आजही आपल्या देशाला आहे असे वाटत नाही. त्यामुळेच आजच्या सत्ताधाºयांना गांधी व आंबेडकरांचे विचार पुसून टाकायचे आहेत. गांधींनी नेहमीच राष्टÑवाद हा शब्द न वापरता रामराज्य हा शब्द वापरला आहे. गांधींचा राम आणि गोळवळकरांच्या डोक्यातील राम यात फरक असून, पुरोगामी विरोधकांकडून गांधींबद्दल चुकीचे चित्र रंगविले जात आहे. मार्क्स, गांधी व आंबेडकरांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या भल्याचा विचार केला. तिघांचे भाव वेगळे असले तरी, त्यांची राष्टÑवादाची संकल्पना अधिक व्यापक होती.प्रारंभी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पोळ व राणी यादव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सनतकुमार आरवाडे, दिनकर साळुंखे, तानाजीराव मोरे, सुरेश पाटील, बी. आर. थोरात, अजित सूर्यवंशी उपस्थित होते.भक्तांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनीगांधी म्हणाले, महापुरुषांना विशिष्ट विचारात, जातीत बंदिस्त करण्यातच त्यांच्या भक्तांनी धन्यता मानली. या महापुरुषांच्या विचारांचा अवलंब न करता केवळ त्यांचा उदोउदो करून भक्तीचाही व्यापार बनवित भक्ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनविली आहे. मार्क्स, गांधी आणि आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याऐवजी गांधी म्हणजे खादी, आंबेडकरवादी म्हणजे निळा रंग, मार्क्स म्हणजे गळ्यात अडकविलेली बॅग हा युनिफॉर्म अंगिकारण्याकडे भक्तांचा ओढा वाढला आहे. याचा पुरेपूर फायदा घेत दुसºया शक्तींनी महामानवांचे विचार पुसून टाकण्याचे काम चालू केले आहे.ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे म्हणाले, ज्या राष्टÑात दरवर्षी चार लाख शेतकरी आत्महत्या करत असताना, तीन लाख मुली गर्भाशयात मृत होत असताना ते राष्टÑ रामराज्य कसे, असे असू शकेल? आजच्या राजकीय परिस्थितीत राष्टÑवादाचा विचार मांडणाºयांना देशद्रोही ठरविले जात आहे. राज्यघटनेला चकवा देत समांतर यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भगव्या कपड्यातील लोक सत्तेवर आल्यावरच राष्टÑवादाला धोका निर्माण झाला आहे.