शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

धर्माबरोबरच इतिहासाचे विभाजन धोक्याचे: तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:22 IST

सांगली : आपले गट तयार करून त्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात महापुरूषांच्या विचारांच्या विरोधकांना रान मोकळे करून दिले जात ...

सांगली : आपले गट तयार करून त्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात महापुरूषांच्या विचारांच्या विरोधकांना रान मोकळे करून दिले जात आहे. आपले लोक उपेक्षित राहिले तरच आपला विकास होईल, हा घातक विचार पेरला जात आहे. महापुरूषांच्या विचारांना पुतळ्यांमध्येच बंदिस्त करून ठेवत धर्माबरोबरच इतिहासाचेही करण्यात येत असलेले हे विभाजन धोकादायक आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी फौंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त तुषार गांधी यांनी रविवारी सांगलीत केले.प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरमच्यावतीने आयोजित मार्क्स, गांधी, आंबेडकर यांचा ‘राष्टÑवाद’ संकल्पनेवरील विचारमंथनात बीजभाषणावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनीही या विषयावर परखडपणे आपली मते व्यक्त केली.गांधी म्हणाले, महापुरूषांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या कार्यकर्त्यांना परस्परात लढवून आपला हेतू साध्य करण्यासाठी काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळेच पुतळ्यांच्या उंचीबरोबरच त्या बांधणाºयांच्याही उंचीच्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. गांधी व आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद जरूर होते. मात्र त्यांच्यात वैमनस्य नव्हते. तरीही त्यांच्यातील मतभेद, वैमनस्यच अधिक प्रकर्षाने दाखविण्यात काहीजण आघाडी घेत आहेत. एकमेकांच्या विचारांचा तिरस्कार न करता त्यांचा आदर ठेवून काम केल्यासच या विरोधकांना चपराक बसणार आहे. धर्माच्या विभाजनाबरोबरच इतिहासाच्या विभाजनाचे कटकारस्थान रचले जात असून, सर्वांनीच सजग राहिले पाहिजे. त्यांच्यातील मतभेदांपेक्षा त्यांच्या समाजविषयक कार्यावर सर्वांनी विचार करायला हवा.राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले, अलीकडे राष्टÑवादाचा बोलबाला सुरू झाला असला तरी, दुर्दैवाने कोणालाही राष्टÑवाद समजलेलाच नाही. रोजच्या जगण्याबद्दल, समस्यांबद्दल बोलले तरी त्याला राष्टÑद्रोही ठरविले जात आहे. आपल्या समुदायापुरता, समाजापुरता महापुरूषांनी कधीच विचार केला नव्हता. राष्ट्रवादाच्याविरोधात नक्षलवादाला पुढे केले जात आहे. राष्टÑवादाचे खरे भान आजही आपल्या देशाला आहे असे वाटत नाही. त्यामुळेच आजच्या सत्ताधाºयांना गांधी व आंबेडकरांचे विचार पुसून टाकायचे आहेत. गांधींनी नेहमीच राष्टÑवाद हा शब्द न वापरता रामराज्य हा शब्द वापरला आहे. गांधींचा राम आणि गोळवळकरांच्या डोक्यातील राम यात फरक असून, पुरोगामी विरोधकांकडून गांधींबद्दल चुकीचे चित्र रंगविले जात आहे. मार्क्स, गांधी व आंबेडकरांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या भल्याचा विचार केला. तिघांचे भाव वेगळे असले तरी, त्यांची राष्टÑवादाची संकल्पना अधिक व्यापक होती.प्रारंभी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पोळ व राणी यादव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सनतकुमार आरवाडे, दिनकर साळुंखे, तानाजीराव मोरे, सुरेश पाटील, बी. आर. थोरात, अजित सूर्यवंशी उपस्थित होते.भक्तांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनीगांधी म्हणाले, महापुरुषांना विशिष्ट विचारात, जातीत बंदिस्त करण्यातच त्यांच्या भक्तांनी धन्यता मानली. या महापुरुषांच्या विचारांचा अवलंब न करता केवळ त्यांचा उदोउदो करून भक्तीचाही व्यापार बनवित भक्ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनविली आहे. मार्क्स, गांधी आणि आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याऐवजी गांधी म्हणजे खादी, आंबेडकरवादी म्हणजे निळा रंग, मार्क्स म्हणजे गळ्यात अडकविलेली बॅग हा युनिफॉर्म अंगिकारण्याकडे भक्तांचा ओढा वाढला आहे. याचा पुरेपूर फायदा घेत दुसºया शक्तींनी महामानवांचे विचार पुसून टाकण्याचे काम चालू केले आहे.ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे म्हणाले, ज्या राष्टÑात दरवर्षी चार लाख शेतकरी आत्महत्या करत असताना, तीन लाख मुली गर्भाशयात मृत होत असताना ते राष्टÑ रामराज्य कसे, असे असू शकेल? आजच्या राजकीय परिस्थितीत राष्टÑवादाचा विचार मांडणाºयांना देशद्रोही ठरविले जात आहे. राज्यघटनेला चकवा देत समांतर यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भगव्या कपड्यातील लोक सत्तेवर आल्यावरच राष्टÑवादाला धोका निर्माण झाला आहे.