शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
3
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
4
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
5
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
6
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
7
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
8
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
9
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
10
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
11
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
12
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
13
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
14
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
15
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
16
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट
17
औषधी बनवणाऱ्या कंपनीत स्फोट! १० कामगार ठार, स्फोट झाला तेव्हा १५० लोक करत होते काम
18
सर्वात कमी खर्चात बंपर परतावा देणाऱ्या टॉप ५ स्मॉल कॅप फंड योजना! ५ वर्षात पाचपट रिटर्न
19
'भारतासोबतचे संबंध आणखी मजबूत झाले', मुस्लिम देशाने भारताची स्तुती केल्याने पाकिस्तानला मिरची
20
धक्कादायक! चहाच्या टपरीमागे नेत अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; गळ्याला चाकू लावला अन्...

धर्माबरोबरच इतिहासाचे विभाजन धोक्याचे: तुषार गांधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 11, 2018 23:22 IST

सांगली : आपले गट तयार करून त्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात महापुरूषांच्या विचारांच्या विरोधकांना रान मोकळे करून दिले जात ...

सांगली : आपले गट तयार करून त्यावर वर्चस्व प्रस्थापित करण्याच्या नादात महापुरूषांच्या विचारांच्या विरोधकांना रान मोकळे करून दिले जात आहे. आपले लोक उपेक्षित राहिले तरच आपला विकास होईल, हा घातक विचार पेरला जात आहे. महापुरूषांच्या विचारांना पुतळ्यांमध्येच बंदिस्त करून ठेवत धर्माबरोबरच इतिहासाचेही करण्यात येत असलेले हे विभाजन धोकादायक आहे, असे प्रतिपादन महात्मा गांधी फौंडेशनचे व्यवस्थापकीय विश्वस्त तुषार गांधी यांनी रविवारी सांगलीत केले.प्राचार्य डॉ. पी. बी. पाटील सोशल फोरमच्यावतीने आयोजित मार्क्स, गांधी, आंबेडकर यांचा ‘राष्टÑवाद’ संकल्पनेवरील विचारमंथनात बीजभाषणावेळी ते बोलत होते. यावेळी ज्येष्ठ विद्रोही साहित्यिक राजाभाऊ शिरगुप्पे, ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे यांनीही या विषयावर परखडपणे आपली मते व्यक्त केली.गांधी म्हणाले, महापुरूषांच्या विचारांचा वारसा जपणाऱ्या कार्यकर्त्यांना परस्परात लढवून आपला हेतू साध्य करण्यासाठी काही शक्ती कार्यरत झाल्या आहेत. त्यामुळेच पुतळ्यांच्या उंचीबरोबरच त्या बांधणाºयांच्याही उंचीच्या गोष्टी सुरू झाल्या आहेत. गांधी व आंबेडकर यांच्यात वैचारिक मतभेद जरूर होते. मात्र त्यांच्यात वैमनस्य नव्हते. तरीही त्यांच्यातील मतभेद, वैमनस्यच अधिक प्रकर्षाने दाखविण्यात काहीजण आघाडी घेत आहेत. एकमेकांच्या विचारांचा तिरस्कार न करता त्यांचा आदर ठेवून काम केल्यासच या विरोधकांना चपराक बसणार आहे. धर्माच्या विभाजनाबरोबरच इतिहासाच्या विभाजनाचे कटकारस्थान रचले जात असून, सर्वांनीच सजग राहिले पाहिजे. त्यांच्यातील मतभेदांपेक्षा त्यांच्या समाजविषयक कार्यावर सर्वांनी विचार करायला हवा.राजाभाऊ शिरगुप्पे म्हणाले, अलीकडे राष्टÑवादाचा बोलबाला सुरू झाला असला तरी, दुर्दैवाने कोणालाही राष्टÑवाद समजलेलाच नाही. रोजच्या जगण्याबद्दल, समस्यांबद्दल बोलले तरी त्याला राष्टÑद्रोही ठरविले जात आहे. आपल्या समुदायापुरता, समाजापुरता महापुरूषांनी कधीच विचार केला नव्हता. राष्ट्रवादाच्याविरोधात नक्षलवादाला पुढे केले जात आहे. राष्टÑवादाचे खरे भान आजही आपल्या देशाला आहे असे वाटत नाही. त्यामुळेच आजच्या सत्ताधाºयांना गांधी व आंबेडकरांचे विचार पुसून टाकायचे आहेत. गांधींनी नेहमीच राष्टÑवाद हा शब्द न वापरता रामराज्य हा शब्द वापरला आहे. गांधींचा राम आणि गोळवळकरांच्या डोक्यातील राम यात फरक असून, पुरोगामी विरोधकांकडून गांधींबद्दल चुकीचे चित्र रंगविले जात आहे. मार्क्स, गांधी व आंबेडकरांनी नेहमीच सर्वसामान्यांच्या भल्याचा विचार केला. तिघांचे भाव वेगळे असले तरी, त्यांची राष्टÑवादाची संकल्पना अधिक व्यापक होती.प्रारंभी नवभारत शिक्षण मंडळाचे संचालक गौतम पाटील यांनी स्वागत केले. राजेंद्र पोळ व राणी यादव यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी सनतकुमार आरवाडे, दिनकर साळुंखे, तानाजीराव मोरे, सुरेश पाटील, बी. आर. थोरात, अजित सूर्यवंशी उपस्थित होते.भक्तांची प्रायव्हेट लिमिटेड कंपनीगांधी म्हणाले, महापुरुषांना विशिष्ट विचारात, जातीत बंदिस्त करण्यातच त्यांच्या भक्तांनी धन्यता मानली. या महापुरुषांच्या विचारांचा अवलंब न करता केवळ त्यांचा उदोउदो करून भक्तीचाही व्यापार बनवित भक्ती प्रायव्हेट लिमिटेड कंपनी बनविली आहे. मार्क्स, गांधी आणि आंबेडकरांचे विचार आत्मसात करण्याऐवजी गांधी म्हणजे खादी, आंबेडकरवादी म्हणजे निळा रंग, मार्क्स म्हणजे गळ्यात अडकविलेली बॅग हा युनिफॉर्म अंगिकारण्याकडे भक्तांचा ओढा वाढला आहे. याचा पुरेपूर फायदा घेत दुसºया शक्तींनी महामानवांचे विचार पुसून टाकण्याचे काम चालू केले आहे.ज्येष्ठ पत्रकार उत्तम कांबळे म्हणाले, ज्या राष्टÑात दरवर्षी चार लाख शेतकरी आत्महत्या करत असताना, तीन लाख मुली गर्भाशयात मृत होत असताना ते राष्टÑ रामराज्य कसे, असे असू शकेल? आजच्या राजकीय परिस्थितीत राष्टÑवादाचा विचार मांडणाºयांना देशद्रोही ठरविले जात आहे. राज्यघटनेला चकवा देत समांतर यंत्रणा उभारण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. भगव्या कपड्यातील लोक सत्तेवर आल्यावरच राष्टÑवादाला धोका निर्माण झाला आहे.